वर्धा जिल्ह्याविषयी
सध्या अस्तित्वात असलेला वर्धा जिल्हा १८६२ पर्यंत नागपूर जिल्ह्याचा एक भाग होता. पूढे प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने वर्धा जिल्हा वेगळा करण्यात आला आणी पुलगाव जवळील कवठा येथे जिल्हा मुख्यालय ठेवण्यात आले होते. सन १८६६ मध्ये जिल्हा मुख्यालय पालकवाडी (वर्धा) येथे हलविण्यात आले होते.
वर्धा जिल्हा हा पश्चिम भारतातील महाराष्ट्र राज्यातील आहे. हा जिल्हा नागपूर विभागाचा एक भाग आहे. वर्धा शहर हे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. हिंगणघाट, आर्वी आणि वर्धा ही जिल्ह्यातील प्रमुख शहरे आहेत. 2011 पर्यंत जिल्ह्याची लोकसंख्या 1,300,774 होती, त्यापैकी 26.28% शहरी होते. महाराष्ट्र राज्यातील भौगोलिक दृष्टया 6309 चौ. कि.मी. आकाराने लहान असलेल्या वर्धा जिल्हयाचे महत्व परमपूज्य महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांच्या वास्तव्याने सिध्द झाले आहे. स्वातंत्र्य लढयात जिल्हयाचे योगदान सर्वश्रृत आहे. सेवाग्रामची प्रार्थना, पवनारची पदयात्रा व आष्टीचा संग्राम या जिल्हयाची अस्मिता आहे.
या जिल्हयात 8 तालुके व तेवढयाच पंचायत समित्या आहेत. जिल्हयातील कृषी क्षेत्राला वरदान ठरणारे बोर नदीवरील बोरधरण व धामनदीवरील महाकाली सिंचन प्रकल्प कृषी क्षेत्राला लाभदायक ठरलेले आहे. हा जिल्हा प्रामुख्याने गांधी जिल्हा म्हणून ओळखला जातो.
वर्धा जिल्ह्याचा इतिहास
वर्धा जिल्हायाचा इतिहास प्राचीन काळापासुनचा आहे. मौर्य, शुंग, सातवाहन आणि वाकाटकांच्या साम्राज्यात त्याचा समावेश होता. वाकाटक हे शाही गुप्तांचे समकालीन होते.प्रवरपुर, आताचे आधुनिक पवनार, एकेकाळी वाकाटक घराण्याची राजधानी होती. वाकाटक हे शाही गुप्तांचे समकालीन होते. चंद्रगुप्त व्दितीय यांची कन्या प्रभवती गुप्त हिचा विवाह वाकाटक शासक रुद्रसेन दुसरा याच्याशी झाला होता. वाकाटक राजवंश इसवी सनाच्या दुस-या ते पाचव्या शतकापर्यंत टिकला. त्यांचे राज्य पश्चिमेला अरबी समुद्रापासुन पुर्वेला बंगालच्या उपसागरापर्यंत आणि उत्तरेला नर्मदा नदीपासुन दक्षिणेला कृष्ण-गोदावरी डेल्टा पर्यंत पसलेले होते. पुढे वर्धा इथे चालुक्य,राष्ट्रकुट, यादव, दिल्ली सल्तनत,बहामनी सल्तनत, बेरारचे मुस्लिम शासक, गोंड आणि मराठे यांचे राज्य होते.गोंड राजा बुलंदशहा आणि राजे रघुजी भोसले हे मध्ययुगीन काळातील प्रमुख राज्यकर्ते होते. वर्धा जिल्हयातील आष्टी शहर हे नवाब मुहम्मद खान नियाझी यांच्या मार्गदर्शनाखाली मुघलांचे राज्य होते, जे मुघल साम्राज्यात सुभेदार व मनसबदार होते. सम्राट अकबराच्या कारकिर्दीत त्यांना आष्टी जहांगीर म्हणुन मिळाली.नवाब अहमद खान नियाझी हा नवाब मुहम्मद खान नियाझीयांचा मोठा मुलगा होता. ज्यांनी सम्राट जहांगीरच्या कारकिर्दीत मुघल दरबारात मनसबदार आणि जहागीरदार म्हणुनही काम केले होते. अहमद खान नियाझीने रहीम खान दख्नीचा पराभव करुन मुघलांसाठी बेरार साम्राज्यातुन एलिचपुर ताब्यात घेतले. 1850 मध्ये वर्धा हा तत्कालीन नागपुरचा भाग ब्रिटिशांचा ताब्यात गेला. त्यात वर्ध्यांचा मध्य प्रांतात समावेश होता. वर्धा हे सेवाग्रामसाठी एक भगिनी शहर आहे आणि दोन्हीचा उपयोग भारतीय स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रमुख केंद्र, तसेच, विशेषत: 1934 मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसच्या वार्षिक संमेलनासाठी आणि महात्मा गांधीच्या आश्रमासाठी मुख्यालय म्हणुन केला जात होता. विद्यमान वर्धा जिल्हा 1862 पर्यंत नागपुर जिल्हयाचा भाग होता. पुढे, सोयीस्कर प्रशासकीय कारणांसाठी वेगळे करण्यात आले आणि पुलगाव जवळील कवठा हे जिल्हयांचे मुख्यालय होते. 1866 मध्ये जिल्हयाचे मुख्यालय पालकवाडी गावात हलवले ज्याची वर्धा शहर म्हणुन पुर्नंबांधणी झाली.
बापुंचा “सेवाग्राम आश्रम”
स्वर्गीय जमनालाल बजाज यांच्या विनंतीवरुन सन 1966 मध्ये महात्मा गांधी वर्धा इथे आले. सेवाग्राम आश्रमातुनच देशाची स्वातंत्र ग्राम चळवळ पुर्ण अर्थाने सुरु झाली. आजही महात्मा गांधीजींचे उपयोगातील साहित्य सेवाग्राम येथील आश्रमात पहावयास मिळते. आश्रमाच्या परिसरातच आदी निवास, बापुकुटी, बा कुटी, आखरी निवास, महादेव कुटी, किशोर कुटी, आदी ऐतिहासीक ठेवा जपण्यात आलेला आहे. या सर्व साहित्याची देखरेख आश्रम ट्रस्टी व्दारे केली जाते. सेवाग्राम आश्रमाच्या बाजुलाच महात्मा गांधीजीच्या जीवनावर आधारीत चित्र प्रदर्शनी आहे. तसेच भारत सरकारच्या पर्यटन आणि विकास खात्याअंतर्गत पर्यटकांसाठी आश्रमाच्या परिसरातच यात्रेकरुंसाठी निवासाची सोयही आहे.महात्मा गांधीच्या स्मरणार्थ सन 1944 साली कस्तुरबा रुग्णालयाची स्थापनाही सेवाग्राम येथे करण्यात आली. त्याचबरोबर डॉ.सुशिला नायर यांनी सन 1969 साली महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालय सेवाग्राम येथे सुरु केलेले आहे.
परमधाम आश्रम
वर्ध्यापासुन पाच मैलाच्या अंतरावर धाम नदी काठावर पवनार हे गाव आहे. या ठिकाणी आचार्य विनोबा भावेंनी 1934 साली परमधाम आश्रमाची स्थापना केली. स्वशांती ब्रम्हाच्याच शोधात निघालेल्या विनोबाजींवर महात्मा गांधीजीच्याच विचारांचा प्रभाव होता. त्यामुळे त्यांनी अंतर्मनाचा ठाव घेवुन पदयात्रा, भुदान चळवळ राबविली. पवनार आश्रम येथुनच भारत छोडो आंदोलनाचे नेतृत्व केले. पवनार यैथील धाम नदीतच महात्मा गांधीजीच्या अस्थीचे विसर्जन करण्यात आले होते.
गिताई मंदीर
गीताई मंदिर हे भारतातील एक अद्वितीय मंदिर आहे ज्याला देवता आणि छप्पर नाही. यात फक्त ग्रॅनाइटच्या स्लॅबच्या भिंती आहेत ज्यावर गीताईचे (मराठीतील श्रीमद-भगवद्-गीता) 18 अध्याय कोरलेले आहेत. एका छोट्याशा सुंदर उद्यानाला भिंतीने वेढले होते. या मंदिराचे उद्घाटन आचार्य विनोबा भावे यांच्या हस्ते 1980 मध्ये झाले.
बोर अभयारण्य
बोर अभयारण्य वर्धा येथुन 40 कि.मी. अंतरावर आहे. या अभयारण्यात वाघ, अस्वल, सांबर,हिरण, मोर इत्यादी प्राणी आढळतात तसेच अनेक जातीचे पक्षी आढळतात. जंगल सफारीची येथे सोय आहे. सदर अभयारण्यातच बोरधरण बांधण्यात आलेले आहे.
विश्वशांती स्तुप
विश्वशांती स्तुप हे महाराष्ट्राच्या वर्धा शहराला लागुल गिताई मंदिराजवळील पांढ-या रंगाचे एक मोठे स्तुप आहे. या स्तुपाच्या चार बाजुवार बुध्द मुर्ती बसवलेल्या आहेत. यामध्ये मोठ्या पार्कसह एक लहान जपानी बौध्द विहारही आहे. स्तुपाजवळ एक मंदीर आहे जेथे सार्वत्रिक शांततेसाठी प्रार्थना केली जाते. जगभरातील सुमारे 80 शांती पॅगोडयापैकी हे एक आहे.
जिल्हा एक दृष्टीक्षेप
क्षेत्र :- 6310 चौ.कि.मी.
भाषा :- मराठी, हिंदी, इंग्लिश
ग्रामपंचायती:- 521
गावे :- 1387
लोकसंख्या :- 1300774
पुरुष :- 668385
स्त्रिया :- 632389
साक्षरता:- 72.80 टक्के