बंद

    उद्दिष्टे आणि कार्ये

    आरोग्य विभाग

    राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे उद्दिष्टे

    राष्ट्रीय आरोग्य मिशन (एनएचएम) लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जबाबदार आणि प्रतिसाद देणाऱ्या न्याय्य, परवडणाऱ्या आणि दर्जेदार आरोग्य सेवांमध्ये सार्वत्रिक प्रवेशाची कल्पना करते. व त्याची उद्दिष्टे खालील प्रमाणे आहे.

    1. बाल आणि माता मृत्युदर कमी करणे.
    2. अन्न आणि पोषण, स्वच्छता आणि स्वच्छतेसाठी सार्वजनिक सेवांमध्ये सार्वत्रिक प्रवेश आणि महिला आणि मुलांचे आरोग्य आणि सार्वत्रिक लसीकरण संबंधी सेवांवर भर देऊन सार्वजनिक आरोग्य सेवांमध्ये सार्वत्रिक प्रवेश.
    3. स्थानिक पातळीवरील स्थानिक रोगांसह संसर्गजन्य आणि गैर-संसर्गजन्य रोगांचे प्रतिबंध आणि नियंत्रण.
    4. एकात्मिक सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवेमध्ये प्रवेश.
    5. लोकसंख्या स्थिरीकरण, लिंग आणि लोकसंख्याशास्त्रीय संतुलन.

    राष्ट्रीय आरोग्य अभियानाची धोरणे

    राष्ट्रीय आरोग्य अभियानाची काही मुख्य आणि पूरक धोरणे आहेत. ज्या धोरणांवर विविध योजना आखल्या जातात ती धोरणे खालील प्रमाणे आहेत.

    मुख्य धोरणे:-

    1. सार्वजनिक आरोग्य सेवांचे मालक, नियंत्रण आणि व्यवस्थापन करण्यासाठी पंचायती राज संस्थांची (पीआरआय) प्रशिक्षण आणि क्षमता वाढविणे.

    2. महिला आरोग्य कार्यकर्त्याच्या (आशा) माध्यमातून घरगुती स्तरावर सुधारित आरोग्यसेवेच्या प्रवेशास प्रोत्साहन देणे.

    3. पंचायतीच्या ग्राम आरोग्य समितीमार्फत प्रत्येक गावासाठी आरोग्य योजना राबविणे.

    4. स्थानिक नियोजन आणि कृती आणि अधिक बहुउद्देशीय कामगार (एमपीडब्ल्यू) सक्षम करण्यासाठी अखंड निधीद्वारे उपकेंद्र मजबूत करणे.

    5. विद्यमान पीएचसी आणि सीएचसीला बळकट करणे, आणि सुधारित उपचारात्मक सेवेसाठी प्रति लाख लोकसंख्येत 30-50 बेडच्या सीएचसीची तरतूद एक मानक मानकासाठी (भारतीय सार्वजनिक आरोग्य मानके, कर्मचारी, उपकरणे आणि व्यवस्थापन मानके परिभाषित करणारे).

    6. पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि स्वच्छता आणि पोषण यासह जिल्हा आरोग्य मिशनने तयार केलेल्या आंतरक्षेत्रीय जिल्हा आरोग्य योजनेची तयारी आणि अंमलबजावणी करणे.

    7. राष्ट्रीय, राज्य, ब्लॉक आणि जिल्हा स्तरावर उभ्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण कार्यक्रमांचे एकीकरण करणे.

    8. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा आरोग्य मोहिमांना तांत्रिक सहाय्य करणे.

    9. पुरावे आधारित नियोजन, देखरेख आणि देखरेखीसाठी डेटा संकलन, मूल्यांकन आणि पुनरावलोकनासाठी क्षमता मजबूत करणे.

    10. आरोग्यासाठी मानवी संसाधनांची तैनाती आणि करिअर विकासासाठी पारदर्शक धोरणे तयार करणे.

    11. निरोगी जीवनशैली, तंबाखू आणि अल्कोहोलचा वापर कमी करण्यासाठी सर्व स्तरांवर प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेसाठी क्षमता विकसित करणे.

    राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे ध्येय

    राष्ट्रीय आरोग्य अभियानाची ध्येय खालील प्रमाणे आहेत.

    1. मातृ मृत्यु दर (एमएमआर) 1/1000 पर्यंत  कमी करणे.
    2. बालमृत्यू दर (आयएमआर) 25/1000  पर्यंत  कमी करणे.
    3. एकूण प्रजनन दर (टीएफआर) 2.1 वर कमी करा.
    4. 15-49 वर्षे वयाच्या महिलांमध्ये अशक्तपणा आणि प्रतिबंध  कमी करणे.
    5. संसर्गजन्य, गैर-संसर्गजन्य पासून मृत्यू आणि रोगराई रोखणे.
    6. एकूण आरोग्यसेवेच्या खर्चावर नियंत्रण मिळविणे.
    7. क्षयरोग्यांची वार्षिक संख्या आणि मृत्यू अर्ध्याने कमी करणे.
    8. कुष्ठरोगाचे प्रमाण <1/10000 लोकसंख्येपर्यंत कमी करणे आणि नंतर सर्व जिल्ह्यांमध्ये घटना शून्यावर आणणे.
    9. वार्षिक मलेरियाच्या रुग्णाची संख्या <1/1000 कमी करणे.
    10. जिल्ह्यांमध्ये 1 टक्क्यांपेक्षा कमी मायक्रोफिलरियाचा प्रसार करणे.

    ग्रामीण व पाणीपुरवठा विभाग

    उद्दिष्टे:-

    भारत देशामध्ये बहुतांश लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहते. ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध व स्वच्छ पेयजलाचा पुरवठा करण्याकरिता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग़ाची स्थापना करण्यात आलेली आहे.

    कार्य:-

    1. ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत विविध पाणी पुरवठा योजनांची अंमलबजावणी करणे.
    2. जिल्ह्यातील ग्रामपंचायती व इतर संस्थांना पाणी पुरवठा विषयक बाबींकरिता तांत्रिक मार्गदर्शन व सहाय्य करणे.
    3. रस्ते, रेल्वे, व केंद्र तथा राज्य शासनाच्या इतर यंत्रणांशी आवश्यक सहकार्य व सहभागाने त्यांच्या योजना पूर्ण करण्यास मदत करणे.
    4. पाणी पुरवठ्याच्या उपांगांचे मूल्यमापन तसेच त्यांचे विविध संकेतस्थळे व पोर्टल्सवर नोंदी ठेवणे.
    5. शासनाच्या भूजल संवर्धन व स्रोत बळकटीकरणांचे उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविणे.

    पाणी आणि स्वच्छता विभाग

    योजनेचे उद्देश:-

    1. ग्रामीण क्षेत्रातील सर्वसाधारण जीवनमानात सुधारणा घडवुन आणणे.

    2. ग्रामीण स्वच्छ्तेच्या व्याप्तीची गती वाढवुन माहे मार्च 2025 पर्यंत सर्व ग्रामपंचायतीना हागणदारी मुक्त अधिक ओडीएफ + मॉडेल) चा दर्जा मिळवुन देऊन शाश्वत स्वच्छ जिल्ह्याचे स्वप्न पुर्ण करणे.

    3. शाश्वत स्वच्छ्तेच्या साधनांचा प्रसार करणाऱ्या पंचायत राज संस्था आणि सामाजिक गटांना जाणीव जाग्रुती व आरोग्य शिक्षण याद्वारे प्रेरीत करणे.

    4. शाळा व अंगण्वाडयांना सुयोग्य स्वच्छता सोयी पुरविणे आणि विद्यार्थाना आरोग्य शिक्षण आणि स्वच्छतेच्या सवयी याबद्दल महिती देणे.

    5. पर्यावरणाच्या दष्टीने सुरक्षित, कायम स्वरुपी स्वच्छेतेसाठी स्वस्त आणि योग्य तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे.

    6. ग्रामीण भागात सार्वत्रिक स्वच्छता राखण्यासाठी घनकचरा व सांडपाण्याच्या विल्हेवाटीला प्राधान्य देणाऱ्या पर्यावरणानुकुल स्वच्छतेच्या पध्दती विकसीत करणे.

    कार्य विभाग

    उद्दिष्टे:-

    जिल्हयात ग्रामीण भागात मुलभूत सोई सुविधामध्ये इमारती व रस्ते यांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक गांव रस्त्याने जोडले असले पाहीजे तसेच दळणवळणसाठी ग्रामीण पायाभूत सुविधेसाठी बांधकाम विभागातील यंत्रणा कटीबध्द आहे.आणि चालू वर्षातील नियमित कामे वेळेच्या आत पूर्ण करणे व पुढील वर्षाचे नियोजन करुन ठेवणे, याकरीता आवश्यक निधीसाठी पाठपुरावा करणे, व्ही.आर., ओ.डी.आर इत्यादी रस्ते व रस्त्यांची देखरेख करणे. एकुणच ग्रामीण लोकसंख्येचे जीवनमान सुधारणे मुख्य उदिष्ट आहे.

    कार्य:-

    बांधकाम विभगातील कामे:- बांधकाम विभागामध्ये विविध योजनेअंतर्गत कामे करण्यात येतात. त्यात खाली प्रकारच्या विविध कामे समाविष्ट करण्यात आलेले आहे.

    माहिती:-

    1. ग्रामीण मार्ग रस्ते विकास व मजबुतीकरण ३०५४-
    2. इतर जिल्हा मार्ग रस्ते विकास व मजबुतीकरण ५०५४
    3. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राचे बांधकाम व दुरुस्ती
    4. क वर्गीय तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रम
    5. पशुवैद्यकिय दवाखाना बांधकाम व दुरुस्ती
    6. प्राथमिक शाळा बांधकामे (वर्गखोली, शौचालय, संरक्षण भिंत) व दुरुस्त
    7. अंगणवाडी बांधकाम व दुरुस्ती
    8. १५ वित्त आयोग अंतर्गत कामे
    9. आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम
    10. खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम
    11. आदीवासी रस्ते विकास माडा मिनीमाडा
    12. १७ सामुहिक विकास कार्यक्रम
    13. २५१५ मा. लोकप्रतिनिधींनी सुचवलिेली कामे

    वरील समाविष्ट असणारी कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे दृष्टीकोनातून बांधकाम विभागातील तांत्रीक विभागातील कर्मचारी तसेच अधिकारी वर्ग सातत्याने प्रयत्नशिल असतात.

    खालील प्रकारची कामे बांधकाम विभागाअंतर्गत करण्यात येतात.

    लघु पाटबंधारे विभाग

    उद्दिष्टे:-

    भारत देशामध्ये बहुतांश लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहते. ग्रामीण भागातील जनतेला शेतीकरीता प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सिंचन सुविधा मिळवुन देण्याकरीता लघुपाटबंधारे विभाग़ाची स्थापना करण्यात आलेली आहे.

    कार्य:-

    1. लघुपाटबंधारे विभागामार्फत विविध सिंचन योजनांची अंमलबजावणी करणे.
    2. जिल्ह्यातील भुगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्याकरीता जलसंधारणाची कामे करणे.
    3. शासनाच्या जलसंवर्धन व स्रोत बळकटीकरणांचे उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविणे.

    माध्यमिक शिक्षण विभाग

    उद्दिष्टे:-

    1. ग्रामीण भागात शिक्षणाचा दर्जा उंचावणे.
    2. विदयार्थ्यांच्या गुणवत्ता वाढवणे.
    3. केंद्र आणि राज्य शासनाच्या येाजना प्रभाविपणे राबविणे.
    4. शिक्षण विभागा संबधित अधिक माहितीसाठी जिल्हा परिषद वर्धा चे वेबसाईट ला भेट देऊ शकतात.

    कार्ये:-

    1. जिल्हयातील सर्व शासकीय मान्यता प्राप्त माध्यमिक शाळांचे कामकाज पाहणे.
    2. अनुदानित , विना अनुदानित , कायम विना अनुदानित शाळांचे प्रशासन चालविणे.
    3. शासनाच्या विविध योजना विदयार्थ्यापर्यंत पोहोचवणे.
    4. शिक्षकांची पदनिश्चिती करणे आणि वेतन अदा करणे.
    5. शाळांची मान्यता, संच मान्यता, रोस्टर तपासणी करणे.
    6. शिक्षकांचे पदभरतीला मान्यता देणे.
    7. अनुदान वाटप करणे.
    8. शैक्षणिक उपक्रम आयोजित करणे.

    कृषी विभाग

    उद्दिष्टे:-

    आधुनिक कृषितंत्राच्या वापरासाठी शेतकरी हा केंद्रबिंदु मानुन आवश्यक त्या सर्व संसाधनाचा योग्य वापर करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणे व अर्थसहाय्य करणे. तसेच जिल्हात गुणवत्ता पुर्ण कृषि निविष्ठा पुरवठा सुरळीत ठेवणे च्या अनुषंगाने उपाययोजना करणे.

    कार्य:-

    1. राज्य पुरस्कृत योजनाची अंमलबजावणी करुन जिल्हातील शेतकऱ्यांना सिंचन विहीरीकरीता अर्थ सहाय्य देवून त्यांनी आर्थिक परिस्थिती सुदृढ करणे.

    2. गुणवत्ता पुर्ण कृषि निविष्ठा जिल्हातील शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे याकरीता नियोजन करणे व गुणनियंत्रक निरिक्षकामार्फत गुणवत्तेबाबत मोहीम राबवुन गुणवत्तेची कृषि निविष्ठा उपलब्ध करुन देणे.

    3. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा व निविष्ठा विषयक माहिती मिळण्याकरीता कृषि मेळावा व सभा घेवून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे.

    महिला आणि बालविकास विभाग

    ध्येय/उदिष्टे:-

    1. 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना पोषण व आरोग्य विषयक स्थीतीमध्ये सुधारणा घडवून आणणे.
    2. बालकांच्या योग्य शारिरीक, मानसीक व सामाजिक विकासाचा पाया घालणे.
    3. अर्भक मृत्यु बाल मृत्यु, कुपोषण गळतीच्या प्रमाणात घट करणे.
    4. जिल्हा कुपोषण मुक्त करणे.
    5. सार्वागिण पध्दतीने महिला आणी बालकांचे अस्तीत्व ,संरक्षण, विकास, कल्याण आणी सहभाग वाढविण्यावर लक्ष केंद्रित करणे.

    पशुसंवर्धन विभाग

    खात्याचे उदिष्टे:-

    सुधारित पशुसंवर्धन तंत्राद्वारे जिल्ह्यातील आर्थिक आणि पोषण विकास सुनिश्चित करणे.

    पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद वर्धा अंतर्गत एकूण ८५ पशुवैद्यकीय दवाखाना कार्यरत आहेत. ज्यामध्ये २१ पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१, ६२ पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ व १ फिरते पथक कार्यरत आहेत. विभागातील पशुधन विकास अधिकारी, सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक यांना नेमून दिलेले तांत्रिक कार्य लक्षांक हे पशुपालकांचा लाभ हेच अंतिम ध्येय आहे. पशुपालकाच्या सर्वांगीने विकासासाठी विभाग कार्यरत असून त्यादृष्टीने विभागाची वाटचाल सुरु आहे.

    1. आजारी जनावरांवर औषधोपचार
    2. प्रतिबंधात्मक लसीकरण
    3. आवश्यक लहान मोठया शस्त्रकिया
    4. कृत्रीम रेतनाद्वारे संकरित जनावरांची पशुपैदास
    5. बेरड वळू चे खच्चीकरण
    6. वांझ व गाभन जनावरांची तपासणी व त्यावर आवश्यक असलेला औषधोपचार
    7. शासन तसेच जिल्हा परिषदे मार्फत राबविण्यात येणा-या योजनांचे पशुपालकांना लाभ होईल या हेतुने विहित योजनांची अंमलबजावणी व पशुपालकांना योग्य मार्गदर्शन करणे